नाशिकची वाहतूक बेटे बँनरमुक्त करावीत - Adv .श्रीधर व्यवहारे

नाशिकच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी नाशिक महानगरपालिकेने औद्योगिक क्षेत्रातील सीएसआर फंडाच्या माध्यमातून विविध सर्कल्स वेगवेगळ्या चौकात उभे केले.
परंतु त्या सर्कल्स ची परिस्थिती दिवसेंदिवस खूपच विदारक होत चालली आहे. अनेक उद्योजकांनी मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करून विविध चौकात सर्कल निर्मिती केली. परंतु नाशिककरांनी त्या ठिकाणी दारूच्या बाटल्या, बियर, प्लास्टिक बॉटल्स आणि घाण टाकून त्या चौकांची आणि सर्कलची घाण टाकून नाशिकचे सौंदर्य कमी करून टाकले आहे. त्यात भर म्हणजे अनेक जण त्या सर्कलचा वापर "बॅनर्स" लावण्यासाठी करतात. त्यामुळे शहराचे मोठ्या प्रमाणात विद्रूपीकरण होत आहे.
नाशिक महानगरपालिकेचा उद्देश चांगला होता.त्यासाठी उद्योजकांनी सधळ हाताने आर्थिक मदत केली. नाशिक बाहेरील येणाऱ्या विविध टुरिस्टना नाशिकचे विदुरपीकरण स्पष्टपणे दिसते. स्वच्छ शहर आणि सुंदर शहर निर्मितीसाठी नाशिक महानगरपालिका विविध उपक्रम राबविते. परंतु आपलेच नाशिककर या सर्कलचा गैरवापर करून नाशिकचे नाव खराब करत आहेत.
याला आळा बसण्यासाठी मायको- बॉश- कंपनीचे जनरल मॅनेजर श्री मुकुंद भट आणि त्यांचे सहकारी, कर्मचारी, कामगार वर्ग, दर आठवड्याला आपले त्र्यंबक रोडवरील मायको बॉश सर्कल दर शनिवारी स्वतः आपल्या हाताने स्वच्छ करीत आहेत. एकतर आर्थिक मदतही करायची आणि वरून आपल्या सर्कलची आपणच स्वच्छता करायची हे चांगले दिसत नाही.नाशिककरांनो या सर्कल्स वरती घाण टाकू नये, बाटल्या टाकू नये, आणि शहराचे विद्रूपीकरण करू नये अशी मानसिकता केव्हा तयार होणार आहे.
आता सिंहस्थच्या निमित्ताने लाखो भाविक लोक नाशिकला येणार आहेत त्यामुळे आपल्या सर्व नाशिककरांची जबाबदारी वाढली आहे की आपले नाशिक स्वच्छ राहावे ही जबाबदारी फक्त नाशिक महानगरपालिकेची नाही, हे समजणे गरजेचे आहे. नाशिकचे हे सर्व सर्कल्स "बॅनरलेस" व्हावेत,
अशी अपेक्षा आहे.
Adv Shridhar Vyawahare
एक नाशिक कर