प्रभाग १७ मधील नागरिकांचा आवाज – शैलेश ढगे यांच्या नेतृत्वाखाली आयुक्तांना दिले निवेदन

प्रभाग १७ मधील नागरिकांचा आवाज – शैलेश ढगे यांच्या नेतृत्वाखाली आयुक्तांना दिले निवेदन

नाशिक | १६ एप्रिल २०२५

प्रभाग क्र. १७ मधील नागरिकांनी आज माजी नगरसेवक शैलेश ढगे यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांची भेट घेऊन प्रभागातील विविध समस्यांबाबत निवेदन दिले.

नागरिकांनी निदर्शनास आणून दिले की, एमएनजीएल आणि अमृतवाहिनी पाणी योजना अंतर्गत टाकण्यात आलेल्या पाइपलाइनमुळे प्रभागातील रस्ते गेल्या सात-आठ महिन्यांपासून खोदलेले आहेत. दगड, माती व राडारोडा मोठ्या प्रमाणावर रस्त्यांवर पडून असून, लवकरच पावसाळा सुरु होणार असल्याने नागरिकांची परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.

तसेच, प्रभागात पाणीपुरवठा विस्कळीत आणि अनियमितपणे होत असून, नागरिकांना दररोज त्रास सहन करावा लागत आहे. गोदावरी नदीत पाण्याची पातळी खालावल्याने व एसटीपीचे निःसरण पाणी आणि वाढलेली जलवनस्पती यामुळे डासांचा प्रचंड प्रादुर्भाव झाला आहे.

या सर्व समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. आयुक्त मनीषा खत्री मॅडम यांना याबाबत सविस्तर निवेदन देण्यात आले.

या वेळी मनोज चिमणकर, गणेश बोराडे, अरविंद भालेराव, किसन कावळे, मधुकर शेलार, भीमराव चव्हाण, दिनेश बागुल, प्रदीप भावसार, अशोक बागुल आदी नागरिक उपस्थित होते.