जागतिक स्तरावर भारताला अग्रस्थान मिळवून द्यायचे असेल तर विज्ञान तंत्रज्ञानआत्मसात केलेली युवा पिढी निर्माण होणे काळाची गरज आहे. भारत हा जगातील सर्वात जास्त युवकांचा देश आहे. हीच आपली संपत्ती आहे. ह्या पिढीला विज्ञान तंत्रज्ञानाचे उत्तम शिक्षण देऊन प्रशिक्षित करणे गरजेचे आहे.असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ गणित अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. वसंत निकम यांनी केले. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या पिंपळगाव बसवंत येथील कर्मवीर काकासाहेब वाघ कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात विज्ञान मंडळ आयोजित राष्ट्रीय विज्ञान दिन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्र. प्राचार्य डॉ. ज्ञानोबा ढगे, विज्ञान मंडळ प्रमुख प्रा. सचिन कुशारे, प्रा.डॉ. नरेंद्र पाटील, प्रा. भगवान कडलग, प्रा. डॉ. अरुण भगरे, प्रा. डॉ. अक्षय धायगुडे, प्रा. डॉ. सचिन जाधव, प्रा. संपत खैरनार, प्रा. तुषार मोरे आदी उपस्थित होते.
प्रा.डॉ. वसंत निकम पुढे म्हणाले की, आपण जीवनात विज्ञान तंत्रज्ञानाचा वापर करतो त्या बरोबर वैज्ञानिक मूल्यपण जोपासली पाहिजे. विद्यार्थ्यांनी आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडींचे निरीक्षण करून त्या मागील कार्यक्रम भाव तपासला पाहिजे. विद्यार्थ्यांनी संशोधन करून त्यावर पेटंट प्राप्त केले पाहिजेत.तसेच जागतिक पातळीवरील उत्तम दर्जा असलेल्या संशोधन पत्रिकेमध्ये आपले संशोधन प्रकाशित करावीत. त्यामुळे संशोधनास गती मिळते.मान्यता प्राप्त होते.असे मत व्यक्त केले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्र. प्राचार्य डॉ. ज्ञानोबा ढगे म्हणाले की, भारताला विज्ञान तंत्रज्ञानामध्ये संशोधन करण्यास मोठा वाव असून विद्यार्थ्यांनी यांचा लाभ घेऊन संशोधनात गती प्राप्त करावी.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते शास्त्रज्ञ सी. व्ही. रमण यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विज्ञान मंडळ प्रमुख प्रा. सचिन कुशारे यांनी करून थोर शास्त्रज्ञ सी. व्ही. रमण यांच्या कार्याचा परिचय देऊन राष्ट्रीय विज्ञान दिनाची पार्श्वभूमी सांगितली. यावेळी विज्ञान मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या संशोधना आधारित प्रकल्पाचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. या प्रदर्शनात १३० विद्यार्थ्यांनी वेगवेगळे संशोधन प्रकल्प सादर केले त्यांना मान्यवरांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वृषाली गागरेपाटील यांनी केले तर आभार प्रा.प्रियंका कुंदे यांनी मानले. कार्यक्रमासाठी प्रा. योगिता शेळके, प्रा. प्रियंका शिंदे, प्रा. स्वप्निल केंदळे, प्रा. संदीप काळे, प्रा. विक्रम जाधव, प्रा. मंगेश जमदाडे, प्रा. संपत खैरनार, प्रा. तुषार मोरे, प्रा. डॉ अक्षय धायगुडे, प्रा. स्नेहल कतवारे, प्रा. प्रिति बिरारी, प्रा. प्रियंका निकम, प्रा. किरण जोहरे, प्रा. गायत्री वीर, शिक्षकेतर कर्मचारी व विज्ञान शाखेतील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.