आधुनिक भारताच्या निर्मितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान महत्त्वाचे - प्रा. एस. एम. चौगुले

आधुनिक भारताच्या निर्मितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान महत्त्वाचे - प्रा. एस. एम. चौगुले

 रावळगाव प्रतिनिधी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय समाजात मोठ्या प्रमाणात सामाजिक व आर्थिक क्रांती घडवून आणली आहे. यासाठी त्यांनी विपुल प्रमाणात लेखन केले आहे. भारतातील आर्थिक स्थिती मांडण्यासाठी त्यांनी अ‍ॅडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ दि ईस्ट इंडिया कंपनी, दि इव्होल्यूशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया आणि दि प्रॉब्लेम ऑफ द रुपी : इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्यूशन ही महत्त्वाची पुस्तके लिहली आहेत, याशिवाय भारतातील सामाजिक, ऐतिहासिक परिस्थिती मांडणारे विपुल लेखन करून त्यांनी आपले विचार सविस्तर मांडले. भारतामध्ये सामाजिक व आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणात असून, माणसा-माणसातील हजारो वर्षापासूनचा विषमतेचा, अज्ञानाचा अंधार दूर करून भारताला नवी दिशा देण्याचे काम केले असून, आधुनिक भारताच्या निर्मितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान महत्त्वाचे राहिले आहे, असे प्रतिपादन प्रा. चौगुले यांनी केले.

            श्री स्वामी समर्थ विद्या प्रसारक मंडळाचे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रावळगाव, ता. मालेगाव जि. नाशिक येथे. येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिन व क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन श्री स्वामी समर्थ विद्या प्रसारक मंडळ डांगसौदाणे ता. बागलाण जि. नाशिक या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. सुरेश दादाजी वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. तर या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा.  एस. एम चौगुले वाणिज्य विभाग, महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेचे कला, वाणिज्य व विज्ञान शहर महाविद्यालय मालेगाव ता. मालेगाव जि. नाशिक हे तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. वाय. व्ह्याळीज हे उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. वाय. व्ह्याळीज, प्रा.  एस. एम चौगुले यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेचे प्रतिमा पूजन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अंबादास पाचंगे यांनी केले, प्रस्ताविक प्रा. भरत आहेर यांनी केले, त्यात त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जीवन कार्याची माहिती दिली. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. कामेश गायकवाड यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यामधून शीतल अहिरे या विद्यार्थिनीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन-कार्यावर आधारित गीत गायन केले.  

            यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी वाय. व्ह्याळीज यांनी डॉ. आंबेडकर व क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कार्याचा गौरव उदगार करताना ते म्हणाले की, विसाव्या शतकातील स्वातंत्र्य पूर्ण व स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहासाचे आकलन व विवेचन करताना डॉ. आंबेडकरांच्या क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कार्याचा संदर्भ घेतल्याखेरीज पूर्ण होणार नाही. भारतातील पारंपारिक समज व्यवस्थेतील स्त्रिया, शुद्र- अतिशूद्र यांना सर्वच मानवी हक्क नाकारले होते. ही व्यवस्था मोडीत काडून नवीन समाजव्यवस्था निर्माण करण्याचे महान कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. तर क्रांतिसिंह नाना पाटील यांनी इंग्रज सरकारला आवाहन देवून सर्वाना न्याय देणारे भारतीयांचे पहिले पत्री सरकार स्थापन केले.

            या कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. जितेंद्र मिसर, प्रा. मनीष ठोके, प्रा. प्रशांत निकम, प्रा.सौ.जी.एस. खैरनार, प्रा. अदिती काळे, प्रा. सारिका सोनवणे, प्रा. सोनम पाटील, प्रा. प्रांजल पवार, प्रा. जिंकल विरमगामा, प्रा. नेहा गांगुर्डे, प्रा. प्रियंका भामरे, प्रा. चेतना हिरे, प्रा. सविता पवार, गिरीश पवार, यांच्या सह महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.